या पुढच्या क्षणात,
सगळं काही विस्कटलेलं असेल
आणि ते विस्कटणारे हात
माझेच असतील;असायला हवेत!
मन सांगतंय.'थोडं थांब;
उशीर होऊदे..अजून जरासा..'
खरं आहे..संपवायचंच तर आहे सगळं
मग असा कितीसा फरक
पडणार आहे एक-दोन क्षणांनी!
पण मध्येच मनच म्हणतं,
पापणी लवायच्या आतच
उरकून जाऊ दे काय ते.
दोन्हीपैकी बरं काय..??
याचा निर्णय मीच घ्यायचा एकटीने!
मृगजळामागे किती दिवस धावतेय.
शांततेच्या शोधात एक एक दिवस ढकलतेय.
खरयापासून लांब,लांब पळतेय.
पुढचा रस्ता..धुक्यात हरवताना बघतेय.
सगळं असंच संपायचं होतं,
तर मग 'ती' सुरुवात तरी का?
धुक्यात हरवायचंच होतं,
तर मग 'ती' पायवाट तरी का?
हे विसकटणं थांबवायचा रस्ता
कधीच भरकटलाय..
मग कशासाठी हा
वेळ काढण्याचा खेळ?!
हा अर्धा मांडला डाव
मला एकदाच विस्कटू दे,
साऱ्या खिडक्या उघडू दे,
या वादळाला मला
आपण होऊन बोलावू दे...
स्वतःच विस्कटते आहे मी;
पण माझीच मला मदत करू दे,
हे मृगजळ माझं,मलाच
या पुढच्या क्षणात संपवू दे..!!
-स्पृहा.
Kiti sunder lihites tu Spruha..
ReplyDeleteapratim.
ReplyDeleteThank u so much..:-)
ReplyDeleteधुक्यात हरवायचंच होतं,
ReplyDeleteतर मग 'ती' पायवाट तरी का?
very nice thought.........
वाह वा! यातल्या भावनांची तरलता खूप हळवी करू पाहतेय.
ReplyDeleteDr.Sunil,Kamlesh..Thanx!
ReplyDeletekevdha vichar kartes ?? :) Bhavna ani shabda julvun ananyachi kala far thodya janankadech aste.. Ani tu tya faar thodya jananpaiki ek ahes.. 'Abhinetri- Kavayitri' hehi asach ek durmil combination..
ReplyDelete